" हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड." शिरीषकुमारचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजीचा. १९४२ साली महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीने भारतभर जनआंदोलन उसळले. गावागावांतून "चले जाव"च्या घोषणा घुमू लागल्या.तिरंगी झेंडे घेऊन मिरवणुका निघू लागल्या. त्यात सर्वांचा, लहान मुलांचाही सहभाग होता. नंदुरबार या आजच्या जिल्हा ठिकाणच्या गावातील ही गोष्ट. शिरीषकुमार व त्याच्या मित्रांनीही अशीच मिरवणूक काढली होती.तिरंगी झेंडा घेतलेला शिरीषकुमार व मुले "वंदे मातरम" च्या घोषणा देत चालली होती.मंगल बाजार परिसरात मिरवणूक आल्यावर अगोदरच तैनातीत असलेल्या पोलिसांनी मिरवणूक अडवली. मिरवणूक सोडून आपापल्या घरी जाण्यास फर्मावले.बंदुकीचा धाक दाखवला. तरीही मुले जागची हलली नाहीत.उलट हातातील तिरंगी झेंडा उंचावून " वंदे मातरम "अशी घोषणा शिरीषकुमारने दिली व " हिंमत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा",असे ठणकावुन म्हणाला. क्षणार्धात रोखलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. शिरीषकुमार धारातीर्थी पडला. तो पडत असतानाच त्याच्या हाती ...